उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रामार्फत कृषि निविष्ठा जसे बियाणे, खते, किटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी लिंकींग करुन विक्री करणे, एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत आकारणे, उपलब्ध साठा असताना विक्री न करणे, खरेदी पावती न देणे, निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची विक्री करणे व मुदतबाह्य निविष्ठांची विक्री करणे, सोयाबीन बियाणे उगवण इत्यादी बाबत तक्रारी किंवा शंका असल्यास कृषि विभागाच्या व्हॉटसॲप क्रमांक 02472223794 वर पाठवाव्यात. तक्रार नोंदवितांना आपले व कृषि सेवा केंद्राचे नाव, गाव व तालुक्याचा उल्लेख करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता (आण्णा) ज्ञानोबा साळुंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी.चिमनशेटे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रामार्फत कृषि निविष्ठा जसे बियाणे, खते, किटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी लिंकींग करुन विक्री करणे, एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत आकारणे, उपलब्ध साठा असताना विक्री न करणे, खरेदी पावती न देणे, निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची विक्री करणे व मुदतबाह्य निविष्ठांची विक्री करणे, सोयाबीन बियाणे उगवण इत्यादी बाबत तक्रारी किंवा शंका असल्यास कृषि विभागाच्या व्हॉटसॲप क्रमांक 02472223794 वर पाठवाव्यात. तक्रार नोंदवितांना आपले व कृषि सेवा केंद्राचे नाव, गाव व तालुक्याचा उल्लेख करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता (आण्णा) ज्ञानोबा साळुंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी.चिमनशेटे यांनी केले आहे.