प्रेस फोटोग्राफर ---राहुल कोरे
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
गेल्या वर्षभरात मोदी सरकार ने जम्मू काश्मिरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करने, तिहेरी तलाकवर बंदी घालणे, आयोध्या येथील राममंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन बांधकाम करणे, पाकिस्तान, बागलादेश, आफगाणिस्तान मधील पीडीत धार्मिक
अल्पख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी सूधारणा कायदा करणे, त्याच प्रमाणे इतर देशांच्या तुलनेने देशात कोरोना समर्थ पणे मुकाबला करणे, त्यामुळे मोदी सरकार अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहे, अशी माहिती भाजपाचे सरचिटणीस तथा मोदी सरकार प्रथम वर्षपुर्ती अभियानाचे राज्याचे संयोजक आ सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राणाजगजतिसिंह पाटील प्रतिष्ठाण भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये  आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, भाजपाचे जिलाध्यक्ष नितीन काळे, माजी अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अॅड खंडेराव चौरे, सतिष दंडनाईक आदी उपस्थित होते. पुढे अधिक माहिती देताना, अामदार ठाकूर यांनी सांगितले की, मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचा समर्थपणे मुकाबला केल्यामुळे देशाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले नाही, भारताची लोकसंख्या आणि कोविंड चा सर्वाधिक फटका बसलेल्या १४ देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखी आहे. सारखीच लोकसंख्या असून ही १ जून २०२० ला १४ देशामधील एकत्रित लोकसंख्या पैकी कोविड  संसर्ग झालेली संख्या भारताच्या ५२ . ५ पट अधिक आहे. तर मृत्यूची संख्या भारताच्या तुलनेत ५५ . २ पट इतकी आहे. मोदी सरकार ने देशात विविध निर्णय घेत देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करणे, कोरोना मुकाबला करण्यासाठी त्वरीत वैद्यकीय सुविधा निर्माण करणे, रूग्णांवर प्रभावी उपचार करने आदी कारणामुळे देशातील नुकसान कमी झाले. कोरोनामुळे अर्थ व्यवस्था ठप्प झाल्यामुळे  झळ बसलेल्या दुर्लब घटकांना केंद्र सरकार ने तातडीने १ लाख  ७० हजार कोटीचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले. आतापर्यंत ४२ कोटी गरजूंना ५३ हजार २४८ कोटीची मदत देण्यात आली.कोटयावधी लोकांना मोफत धान्य, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा जमा करणे, मौफत गॅस सिलेंडर देणे, जनधन खाते, ज्येष्ठ नागरी, विधवा व दिव्यागांना थेट आर्थिक मदत करणे आदी प्रभावपणे मोदी सरकार ने कार्य केले आहे.
  मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवरून नाही तर जमिनीवर येऊन काम करावे
यावेळी  आ. ठाकूर यांनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्याची टिका करून मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवरून नाही तर जमिनीवर येऊन काम करावे, राज्य सरकार ने जनतेला एक दमडीची ही मदत केली नाही, मदत न करणारे एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे, असे आ. ठाकूर यांनी सांगितले.
आ.  राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्र सरकार ने विविध स्वरूपात जिल्हयाला ३०० कोटी रुपयांची मदत झाली आहे व आत्मनिर्भर योजनेतंर्गत विविध योजना जिल्हयात आणून जिल्हा आत्मनिर्भर करणार असल्याचे त्यंानी सांगितले.  शेवटी आभार नेताजी पाटील यांनी मानले. 
 
Top