कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांचे अध्यक्ष खाली दिनांक 28 सप्टेंबर रोजी राधेश्याम मंगल कार्यालय कळंब या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी त्यांनी संस्थेच्या सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल माने, साने गुरुजी पतसंस्था परंडाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर देवराम, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक पतसंस्था वाशीचे अध्यक्ष राजेश ढेंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी,मधुकर तोडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या सर्वसाधारण सभेत पुढे बोलताना श्री तांबारे म्हणाले की आपली पतसंस्था ही राज्यामध्ये एक लौकिक मिळवलेली पतसंस्था असून या पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवण्यात संचालक मंडळाला यश आले आहे 100 कोटी पेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेली आपली ही जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था असून या पतसंस्थेचा कारभार जाणून घेण्यासाठी राज्यातील अनेक पतसंस्थेचे पदाधिकारी येतात.
आपली पतसंस्था सभासदांना अत्यंत कमी म्हणजे 8.5 टक्के व्याज दराने 25 लाख कर्ज देत आहे. तसेच सभासदाच्या मुदत ठेवीवर पण 8.5 टक्के तर कायम ठेवीवर 8 टक्के व्याज देणारी ही राज्यातील एकमेव पतसंस्था असून उच्चतम 15 टक्के लाभांश देणारी राज्यातील एकमेव संस्था आहे.
कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही सभासदांसाठी विविध योजना राबवत असून त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सभासदाच्या मुलीच्या लग्नासाठी 11 हजार रुपये कन्यादान, कोणत्याही कारणाने सभासदाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण कर्जमाफी, शिल्लक नफ्यातून सभासदांना भेटवस्तू, गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम घेतले जातात.
या प्रसंगी जिल्हा सोसायटीचे उपाध्यक्ष कांतीलाल ढोले संचालक हनुमंत पडवळ, प्रदीप म्हेत्रे, संजीवन तांबे, प्रशांत घुटे, नितीन गायकवाड आप्पासाहेब भोंग,महादेव खराटे, महादेव मेनकुदळे हे उपस्थित होते. याप्रसंगी अशोक खडके यांना राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल व मधुकर तोडकर यांचा उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल सपत्नी सत्कार करण्यात आला
या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गौरव
इयत्ता 5 वी मधील युवराज पांचाळ, सिद्धी जगताप, ईश्वरी गायकवाड, समर्थ जावळे, अक्षय गिरी, वेदांत भिसे, शौर्य रणदिवे, अभिनव गिरी,विराज गादेकर, रणवीर मचाले तर इयत्ता 8 वी मधील सायली गायकवाड, ऋषिकेश क्षीरसागर, श्रेयस गिलबिले, साईराज भिसे, राज अनपट, तनिष्का माने, मृणाल पवळ, प्रांजल देशमुख, आदित्य कासले,भक्ति गरड, गार्गी जाधव, नक्षत्रा जावळे, श्रद्धा अनपट, वेदांत शिंदे या सर्वांचा सन्मानचिन्ह रोख बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे उपाध्यक्ष बी एन जाधवर संचालक भक्तराज दिवाने, दत्तात्रय पवार,दत्तात्रय सुरेवाड, भूषण नानजकर, गणेश कोठावळे, अशोक डिकले, दीपक चाळक, सुनील बोरकर, रामचंद्र पवार, रवींद्र शिनगारे वैशाली शिरसागर ज्योती ढेपे व कालींदा मुंडे यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अहवाल वाचन सचिव संतोष ठोंबरे तर आभार भक्तराज दिवाने यांनी मानले.