तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख परिसरात असलेले खडीक्रशर (अजमेरा यांचे) पर्यावरण परवान्याची मुदत ,वाहतूक परवाने, उत्खणन परवाना, हायवे पासुनचे 1 कि. मी. अंतर परिसरात दिलेला परवाना (दिला किंवा नाही) चौकशी करणयाबाबत दि.23 जून रोजी तहसिलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनाद असे नमूद केले आहे की,तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख परिसरात तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या अजमेरा खडी क्रेशरमुळे अनेक शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. खडी क्रेशरच्या धूळ आणि प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, पिके आणि पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होत आहे.
या खडी क्रेशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे जमिनीची सुपीकता कमी होते आहे. अनेक ठिकाणी जमिनी नापीक झाल्याच्या वडगाव लाख परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत.
परिसरातील अनेक शेतकरी खडी क्रेशरच्या विरोधात आवाज उठवत आहेत त्यांचा आवाज अधिकारी व नेते मंडीमुळे दबजला जात आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) तुळजापूर तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी आवाज उठवत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासनाकडे तक्रार केल्या आहेत.
पर्यावरण परवान्याची मुदत ,वाहतूक परवाने,उत्खलन परवाना याची तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी सकोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी एकूणच, खडी क्रेशरमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे, प्रशासनाने यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. डी क्रेशरमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांची स्वाक्षरी आहे.