भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाचे निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव चे मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यात मंडळ ईट येथील सिद्धेश्वर मंदिर सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर (ता 13) रोजी आयोजीत करण्यात आले. यावेळी ईट मंडळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थीत नागरिकांना विविध प्रमाणपत्र, संजय गांधी योजना डीबीटी नोंदणी, ॲग्रीस्टॅक नोंदणी, आधार नोंदणी/ दुरुस्ती, शिधापत्रिका संबंधी दुरुस्ती या योजनांचा लाभ देण्यात आला.
यावेळी उप विभागीय अधिकारी श वैशाली पाटील, तहसिलदार जयवंत पाटील, नायब तहसीलदार प्रवीण जाधव, मंडळ अधिकारी ईट अमर आटोळे, ग्राम महसूल अधिकारी डोके , ईट मंडळ मधील ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, ईट, तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थीत होते.
तसेच ईट गावाचे सरपंच संजय असलकर, प्रताप देशमुख, प्रमोद देशपांडे यांची उपस्थिती होती. सदर शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय भुम चे वतीने करण्यात आले. स्थानिक व्यवस्था मंडळ अधिकारी ईट, ग्राम महसूल अधिकारी ईट, ग्राम पंचायत ईट यांनी पाहिली.
या शिबिरामध्ये शिधापत्रिका (पुरवठा विभाग) 32, तलाठी कार्यालय (उत्पन्न) 38, ॲग्रीस्टिक नोंदणी 28, तलाठी कार्यालय घाटनांदुर 9, तलाठी कार्यालय पखरुड 8, पी एम किसान योजना 52, आधार अपडेट 36, महा-ई-सेवा केंद्र 11, संगायो विभाग 196, मंडळ अधिकारी ईट 41, ई डब्ल्यू एस अहवाल 4, संकीर्ण विभाग 8, ईडब्ल्यूडी उत्पन्न 40, जातीचे प्रमाणपत्र 8, एन एस एल 12, अल्पभूधारक अहवाल 6, रहिवासी 17 असे एकूण 546.