परंडा (प्रतिनिधी) - कराड येथे 31 वे आखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन दि.9 व 10 मे रोजी पार पडले त्यात तुकाराम गंगावणे यांची “बाप“ ही कविता गाजली.दि.11 मे रोजी अकलूज येथे आखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अधिवेशन पार पडले.अकलूज येथे झालेल्या कवि संमेलनाच्या अध्यक्ष मनीषा पाटील हेरोलीकर,उद्घाटक डॉ.सतीश तराळ राज्याध्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद , सुत्रसंचलन डॉ.सतीश होनगावे होते.परंडा येथील जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांच्या “बाप“ या कवितेने संमेलन गाजले.सहभागी कवी लक्ष्मण हेंबाडे,मनीषा पाटील रायजादे ,सांगली ,दिनेश भिसे परभणी, बालाजी जाधव लातूर ,तानाजी राजे ,शाहीर पाटील सांगली , दुर्गा देशमुख परभणी ,राजेश महल्ले अमरावती ,रवींद्र पांचाळ , शंकर कदम परभणी आदि सहभागी होते. यावेळी तुकाराम गंगावणे यांचा सन्मान चिन्ह व एक ग्रंथ देऊन सन्मान केला. याबद्दल गंगावणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.