तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातुन लाखो भाविक शुक्रवारी दाखल झाले आहे. चैञी पोर्णिमा याञेचे धार्मिक विधी शनिवार पासून दि. 12 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. चैञी पोर्णिमा दिनी शनिवारी पहाटे 1 वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शन आरंभ होणार आहे. तर राञी मंदीर प्रांगणत देविजींचा छबिना काढण्यात आल्यानंतर महंताचा जोगवा विधी होणार आहे.
या चैञी पोर्णिमा याञेनिमित्ताने दरवर्षी लाखाच्यावर भाविक दाखल होतात. त्याअनुषंगाने भाविकांची गैरसोय होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राखून भाविकांच्या सूरक्षेसाठी प्रशासनाच्या विविध विभागाने तयारी केली आहे. याञा कालावधीत मंदीर बावीस तास दर्शनार्थ खुले ठेवले जाणार आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार परिसर, भवानी रोड वर उन्हापासुन संरक्षणसाठी भव्य मंडप उभारला आहे. एसटी महामंडळाकडून यात्रेनिमित्त जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. व्यापारी वर्गाने पुजेचे प्रसादाचे साहित्याने आकर्षक मांडणी करीत दुकानात माल भरुन ठेवला आहे. श्री तुळजाभवानी देवीजींचा चैत्र पौर्णिमा निमित्ताने दि. 11 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत भाविक मोठ्या संखेने येत असल्याने त्यांचे दर्शन सुलभ होण्यासाठी गुरुवार राञी पासुन बिडकर पायऱ्यापासून दर्शनार्थ भाविकांना मंदीरात सोडण्यास आरंभ झाला.