भूम (प्रतिनिधी) भूम आगारामध्ये प्रभारी आगार व्यवस्थापक व ए डब्ल्यू एस असल्यामुळे आगाराची आर्थिक हानी होऊन जनसामान्यात प्रतिमा मलीन झाली असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना च्या वतीने विभागीय नियंत्रक धाराशिव यांना निवेदन देण्यात आले आहे .भूम आगारांमध्ये आगार प्रमुखाची बदली झाल्यानंतर आपण प्रभारी आगर प्रमुख म्हणून स्थानक प्रमुख यांची नियुक्ती केली तसेच प्रभारी म्हणून नियुक्ती केली तेव्हापासून आजारातील लांब पाल्याचे नेते आज तागायत वेळेवर गेलेले नाहीत .तसेच रोज 10 वाहने आजारात नादुरुस्त उभे असतात .तसेच रोज मार्गस्थ बिघाड दोन ते तीन बस रस्त्यात उभे असतात .त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक हानी होऊन जनसामान्यात महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचे दिसून येते .तरी धाराशिव विभाग नियंत्रकांनी भूम आजारासाठी कायमस्वरूपी आगार व्यवस्थापक व ए डब्ल्यू एस यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक हानी व जनसामान्यात प्रतिमा मलीन झाल्याची चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी .महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने धाराशिव विभाग नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 
Top