धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील आळणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आमदार कैलास दादा पाटील यांच्या हस्ते इयत्ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश व वासंतीक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, येडशी बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश पारवे, येडशी केंद्र प्रमुख विवेक सरवदे, उपळाचे केंद्रप्रमुख शेषेराव राठोड मुख्याध्यापक बशीर तांबोळी आदीसह येडशी बिटमधील सर्व मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. इयत्ता पाहिलीसाठी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा दि.1 मार्च ते 3 मार्च या कालावधीत सर्व्हे करण्यात आला. 47 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना मराठी शाळेचे महत्व सांगण्यात आले. त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध प्रकारचे मनोरंजक खेळ दि 29 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत त्यांना शाळेत प्रवेशित करून त्यांना अध्यापन करण्यात येणार आहे.
विविध फुलझाडे, औषधी वनस्पती, आणि नैसर्गिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षणाचा माहोल तयार करण्यात आला आहे.
यावेळी उपसरपंच कृष्णजी गाडे, पोलीस पाटील प्रमोद माळी, शामसुंदर लावंड, संजीवनी पौळ, अफसाना शेख, अनिता पौळ, विजयकुमार नांदे बिटमधील मुख्याध्यापक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी तर सूत्रसंचालन सत्यशीला म्हेत्रे यांनी व आभार हनुमंत माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिनेश पेठे, उत्तम काळे, वर्षि डोंगरे, सुनीता कराड, मंजुषा नरवटे, क्रांती मते, सुलक्षणा ढगे, राधा वीर, युवा प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी दादासाहेब कचरे यांनी परिश्रम घेतले.