धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील गवळी गल्लीतील शतकानुशतकापासून चालत आलेल्या परंपरेनुसार होळी सण व उत्सव अत्यंत आनंदाने व उत्साहाने साजरा होतो. गवळी गल्लीमध्ये गोवऱ्याची मानाची होळी मानली जाते. गल्लीमध्ये गोवऱ्याचे प्रमाण जास्त, लाकडांच्या पेक्षा जास्त संख्येने असते. होळीच्या माध्यमातून रात्रभर जागरण करून होळीगीते ,कलगीतुरा ,लोकगीते, संस्कृती गीते, व्यसनमुक्ती गीते, गवळणी, पोवाडे इ. यातून सर्व युवक पिढीला व्यसनमुक्तीचा संदेश राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश, जातीपाती तोडो- मानवतेला जोडो, ढोलकी तुणतुणे, टाळ, हलगी इत्यादी सामान्य वाद्याच्या माध्यमातून स्वर्गीय मलिकार्जुन दहीहंडे, सिद्राम दहीहंडे या प्रमुख गायकांच्या माध्यमातून बाकीचे सहकारी ललकारी देणारे होते .स्व.मारुतीराव दिवटे,देवीदास दहिहंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कला उत्सव होत. विविध कला गुणाना संधी उत्सवातून मिळते.अशी मंडळी आज नसल्याकारणाने डीजे लावून आनंदोत्सव साजरा करणारी तरुणाई आहे. होळी या होळीतून वाईट गुण, विकृती व अहंकार सर्व नष्ट होऊन मानवतेच्या कल्याणासाठी धर्माने जगावे असा हा उत्सव साजरा करण्या पाठीमागचा उद्देश आहे. होळीमध्ये ढेकूण टाकणे,कडब्याची पेंडी अर्धवट जाळणे , नारळ अर्पण करणे,खोबरे- फुटाणे ,शेंगदाणे भाजून घेणे यापाठीमागे रोगराई नष्ट, पर्यावरण संवर्धन ,धार्मिक व वैज्ञानिक दोन्हीही कारणे सिद्ध होतात. भक्ती आणि शक्ती, प्रवृत्ती व विकृती या दोन्ही बाजू माणसाच्या जीवनामध्ये असतात व सणातून लोकसंस्कृतीची जाण निर्माण करून देतात. विविध जाती-धर्मातील अनेक कुटुंब व व्यक्ती नैवेद्य दाखवून होळीचे दर्शन घेऊन वाईट वृत्ती नष्ट होऊ दे व चांगल्या प्रवृत्तीअंगामध्ये निर्माण होऊ दे अशी प्रार्थना करतात. गवळी गल्लीतील होळी प्रज्वलित करण्यापूर्व श्री गजाननाची व श्री तुळजाभवानी मातेची पूजा व आरती करून होळीची विधीपूरक पंचमहाभूताची पूजापाठ करून प्रज्वलित करण्यात आली.प्रा. गजानन गवळी, काशिनाथ दिवटे, मन्मत पाळणे, नंदकुमार हुच्चे,खाडे दाजी, गिरीश व संजय पाळणे,सचिन व रणजित बुरुंग, संदिप दहिहंडे, विश्वास दळवी,वरुण साळुंके,वैभव अंजीखाने,सागर पाळणे,युवराज हुच्चे, गोट्या सापते, राजकुमार दिवटे , अतुल ढोकर श्रीकांत दिवटे, तीर्थकर बंधू उपाध्ये, आकाश सुरवसे, आकाश महामुनी, भालचंद्र हुच्चे ,लहान मुले व मुली बोंब मारून आनंद साजरा केला. होळीच्या जागेवर पाणी शिंपडून सडा टाकून, छोट्याशा मडक्यामध्ये पैसे ठेवून, गोवऱ्या रचून, होळीभोवती रांगोळी काढून मुलींनी नंदीनी दहिहंडे व रुद्राक्षी गवळी यांनी सजवले. विविध रंग आकर्षक रचलेल्या गोवऱ्यावर टाकून व मुला मुलींनी, तरुण पिढीने बोंब मारीत होळीभोवती प्रदक्षिणा घालून होळीचे दर्शन घेत होते. अनेक घरातून होळीला नैवेद्य पूरण पोळीचा दाखविला जात होता.अनेक कुटुंब सार्वजनिक होळीसाठी एकत्र जमून पूजा करुन दर्शन घेतले जातात. आजही गोवऱ्याची होळी केली जात आहे. गणपती बप्पा मोरया, आई राजा उदो उदो, बोल भवानी की जय, छ.शिवाजी महाराज की जय, छ.संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा जयघोषात व बोंबलू नका रे, बोंब मारून तरुणाई दणाणून गेली होती.वर्षातून ही एकदाच बोंब मारून संधीचा फायदा होळीच्या निमित्ताने चांगल्या वृत्तीने करण्याचा प्रयत्न केला जात असतो.