भूम (प्रतिनिधी)- उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई व धाराशिव जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या दोन दिवसाच्या ग्रंथोत्सवानी जिल्ह्यातील वाचन चळवळीला मोठी बळकटी मिळाली आहे. प्रामुख्याने आयोजित कवी संमेलनात तर अनेकांच्या बहारदार काव्य सादरीकरणाने मोठी बहार आली होती. यामध्ये नवकवी शंकर खामकर यांनी आयुष्य व समस्या या विषयाला अनुसरून केलेल्या काव्य सादरीकरणाला काव्य रसिका बरोबरच कवींनी देखील मोठी दाद दिली .

धाराशिव येथे जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यवतीने दिनांक 24 व 25 मार्च 2025 या दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचे आयोजन केले होते . या दरम्यान ग्रंथ दिंडी व वाचन संस्कृती,  समस्या, संधी व उपाय या विषयाला अनुसरून डॉ बालाजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित केले होते, तर नामांकित गझलकार भागवत घेवारे यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलन आहे आयोजित केले होते. 

या कवी संमेलनालामध्ये ज्येष्ठ कवयित्री प्रा. अल्का सपकाळ, नवकवी शंकर खामकर,  संध्याराणी कोल्हेसह अनेक ज्येष्ठ व नवकवींनी स्वरचित कवितेचे बहारदारपणे सादरीकरण केले. अनेकांच्या सादरीकरणाला उपस्थित कवी बरोबरच काव्य. रसिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला.  यामध्ये भूमचे नवकवी शंकर खामकर यांनी आयुष्य व आयुष्यातल्या समस्या या विषयाला हात घालून बहारदार काव्य सादरीकरण केले.

आयुष्य व समस्या या कवितेमध्ये प्रामुख्याने सादरीकरण केलेल्या कवितेतून म्हटले की , 

मरण एवढं स्वस्त नाही की 

गळ्याला फास लावून 

जीवन संपवावं 

ज्यांनी खास्ता खाल्ल्या 

त्यालाच विचाराकी

आयुष्य कसं जगावं

यामध्ये होत असलेल्या आत्महत्या संदर्भात भावना व्यक्त केली आहे . आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाऊन मार्ग काढत आयुष्य जगलं पाहिजे , अनुभवी व्यक्तींचे सल्ले मोलाचे असतात, ते घेतले पाहिजे या भावना व्यक्त करतानाच त्यांनी म्हटले की,

जो समस्येला घाबरतो 

तोच असा निर्णय घेतो 

जो समस्येला सामोरे जातो 

तोच खरा जीवन जगतो

म्हणजे आयुष्य जगताना समस्या येतच राहणार आहे, अडचणी येतच राहणार आहे , म्हणून का जीवनाचा कंटाळा येतो का , प्रत्येक समस्येवरती मार्ग काढला पाहिजे, अडथळ्याची शर्यत पार केली पाहिजे हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे ते पुढे म्हणतात 

मनुष्य जन्म परत परत नाही 

त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे 

आनंदी जीवनाचे धडे 

इतरांनाही दिले पाहिजेत

अनुभव हा फार मोठा गुरु आहे , आयुष्य जगत असताना ज्येष्ठांचे सल्ले, जेष्ठाच मार्गदर्शन निश्चितपणे महत्त्वाच असते ज्यांना अनुभव आहे , त्यांनी देखील आपले अनुभव इतरांना सांगणे आवश्यक आहे, असेही ही म्हटले आहे शेवटी नवकवी शंकर खामकर यांनी नमूद केले आहे की

समस्ये विना जीवन आहे का 

समस्येमुळेच तर माणूस विचारी बनला

मार्ग काढत राहिला तोच 

आयुष्यात यशस्वी झाला 

या ओळीतून त्यांनी सुंदर असं प्रबोधन करताना म्हटलं, आयुष्य म्हटलं की समस्या आहे  समस्यातून मार्ग काढत राहिला, म्हणजेच तो विचारी बनला , अडथळे पार करू लागला, मार्ग काढत राहिला आणि म्हणूनच त्याला आयुष्याच्या यशाचा मार्ग सापडला ,तोच आयुष्यात यशस्वी झाल्याचं आवर्जून त्यांनी आपल्या काव्य सादरीकरणातून मांडण्याचा प्रयत्न केला . 

अशा या कवी संमेलनात देखील अनेकांनी आपल्या छोट्या मोठ्या गझल सादर केल्या, अनेकांनी वेगवेगळ्या विषयावरती काव्य  सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  शेवटी आयोजकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी त्याचबरोबर, ज्येष्ठ इतिहास संशोधक साहित्यिक युवराज बप्पा नळे, गझलकार भागवत घेवारे, सूत्रसंचालक प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांच्या हस्ते कवींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व सुंदर असं पुस्तक भेट देऊन सन्मानित करून नव साहित्यिकांच्या चळवळीला, साहित्याच्या लेखणीला प्रोत्साहन देत बळकटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 
Top