धाराशिव (प्रतिनिधी)- ठिबक सिंचना सारखी आधुनिक सिंचन पद्धती वापरुन पाण्याचा कार्यक्षम उपयोग शेतीसाठी करुन पिक उत्पादनात वाढ घडवुन आणली पाहिजे. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे. तरच शाश्वत जल व्यवस्थापनाच्या माध्यमातुन भारत गुणवत्तापूर्ण धान्य उत्पादनात आत्मनिर्भर होईल. असे प्रतिपादन प्रा. डॉ. रमेश पांडव यांनी केले. अन्न सुरक्षेसाठी जल व्यवस्थापन या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव येथील जल व भूमी व्यवस्थापन विभागाच्या वतीने परिषद आयोजित करण्यात आले होते. 

पुढे बोलताना प्रा. पांडव म्हणाले की, रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा अतिवापरामुळे  जमीनी नापिक बनत आहेत. अन्न विषयुक्त बनत आहे. सकस व पौष्टिक अन्न आरोग्यता मानसिक व शारीरिक जपण्यासाठी आवश्यक आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करणे म्हणजे संभाव्य रोग होणार नाहीत. कोणतीही आपत्ती येणार नाही. नदीजोड प्रकल्प राबविणे काळाची गरज आहे. इस्राइल मधील जलसिंचन सुविधा याविषयी त्यांनी सखोल विश्लेषण केले. कमी पावसाचा प्रदेश अजुनही, इस्राइल इच्छा शक्तीच्या बळावर, समुद्रातील पाण्याचे डिसॅलिनेशन करुन, गोड़या पाण्याची उपलब्धता वाढविण्यात आली आहे. मराठवाडयाच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी मिळाले पाहिजे. असे मत व्यक्त प्रा. डॉ. पांडव यांनी व्यक्त केले.

दुसरे तांत्रिक सत्रात, डॉ. तांबडे यांनी 'वॉटर स्मार्ट शेती' विषयावर मार्गदर्शन केले.  पाणी व्यवस्थापनात हुशारीने आणि कार्यक्षमतेने बदल घडवुण आणता येतो. प्रास्ताविक जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख व राष्ट्रीय परिषदेचे निमंत्रक डॉ. नितीन पाटील यांनी केले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अधिसभा सदस्य देविदास पाठक यांनी पाणी व्यवस्थापनाचे महत्व स्पष्ट केले. माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजन सचिव अभिजित पडवळ यांनी आभार मानले. प्राध्यापक, संशोधक, कर्मचारी, विद्यार्थी, बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

 
Top