भूम (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा निर्गुण खून प्रकरणाचा तपास जलद गतीने करून प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधित आरोपींना अटक करून कठोर शासन करण्याचे मागणी सकल मराठा समाज भूम तालुक्याच्या वतीने देण्यात उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
संतोष पंडितराव देशमुख राहणार मस्साजोग यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुणपण एकूण करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून नागरिकांमध्ये भेटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रास्ता रोको आंदोलने करण्यात येत आहे. संतोष पंडितराव देशमुख मस्साजोग गावचे सरपंच होते. सदर घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे सदर प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व संबंधित आरोपींना अटक करून कठोर शासन करणे अत्यंत गरजेचे आहे. देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास जलद गतीने करून प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व संबंधित आरोपींना अटक करून कठोर शासन करावे. अन्यथा सकल मराठा समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सकल मराठा समाजाच्या वतीने दिला आहे.