धाराशिव (प्रतिनिधी)- महागाईवर काही बोलायचे नाही. शेतकरी प्रत्येक गोष्टीवर जीएसटी. भरतात आणि हे प्रचार करतात. मोदींचे 6 हजार आले. खाद्य तेल, सोयापेंड आयात केली. पाण्याची बाटली 20 रूपयाला. शेतकऱ्यांच्या दुधाला 22 रूपये भाव त्यामुळे लोकांना मोदीलाच मतदान करायचे नाही तर उमेदवार तर लय लांब राहिला. असे प्रतिपादन आमदार कैलास पाटील यांनी केले.

तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार कैलास पाटील, धाराशिव शिवसेना सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर यांची सभा पार पडली.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर यांचेही भाषण झाले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, पं स सदस्य संग्राम देशमुख, विनोद वीर, रवि कोरे, विनोद लावंड, माजी सरपंच अंकुश मोरे, पं स. गजेंद्र जाधव, श्रीपाल वीर, युवा सेना धाराशिव तालुका प्रमुख वैभव वीर, राजाभाऊ किरदत्त, अनंत खोबरे, अनंत वीर, राज वीर, विश्वजीत वीर, शामसुंदर लावंड, सचिन देशमुख, अजित वीर, आण्णासाहेब कदम, यांच्यासह शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top