तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करणारा अध्यादेश प्रसिध्द होताच मराठ्यांनी जय भवानी, जय शिवाजी चा जयघोष करीत फटाके फोडुन पेढे वाटून कुंकवाची उधळण करीत तालुक्यात गावोगाव एकच जल्लोष केला.
मराठ्यांनी आरक्षण खेचुन आणत दुसरी दिवाळी आज साजरी केली. घरोघरी गोडधोड आज मराठ्यांच्या घरी करण्यात आले. मराठ्यांबरोबरच मुस्लीम बांधव ही या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. मराठा आरक्षण संघर्षात मुस्लीम समाज बांधवांचे मोठे योगदान असल्याने सकल मराठा समाजाच्या मराठ्यांनी मुस्लीमचे आभार मानले.