भूम (प्रतिनिधी)- पंढरपूर तालुक्यातून चळे गावातील बारा शेतकऱ्यांनी दोन बैलगाड्या घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व शासनाला शेतकरी हाच कुणबी मराठा आहे हे दाखवून देण्यासाठी बैलगाड्या घेऊन पंढरपूर ते अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी निघालेले आहेत. 

भुम शहरात गाड्या दाखल होताच भूम शहरातील मराठा बांधवांनी हलगी ढोल ताशा वाजवीत या मराठा शेतकऱ्यांचे स्वागत केले. सुलतानी सरकारला कुणबी मराठा हाच कुणबी व मराठा शेतकरी आहे हे अद्यापही लक्षात येत नसल्याने या शेतकऱ्याला लक्षात आणून देण्यासाठी आम्ही शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून आमचे शेतातले काम बाजूला ठेवून आम्ही शेतकरी मराठा कुणबी मराठा आहोत हेच दाखवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. असे बैलगाडी घेऊन जाणारे पांडुरंग खिलारे यांनी सांगितले. यांच्यासोबत सुरेश मोरे, सिद्धेश्वर खिल्लारे, लिंबराज मोरे, सुरेश मोरे, बाबू खिल्लारे, किसन पाटील, तानाजी घाडगे, संतोष मिसाळ, पांडुरंग खिल्लारे, कांतीलाल मोरे, बिबीशन मोरे, गणेश कदम आदी चळेगावचे शेतकरी बांधव अंतरवली ला मनोज जरांगे यांच उपोषणाला बळ देण्यासाठी बैलगाड्या घेऊन निघाली आहे.


 
Top