उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी आवडी क्षेत्र निवडावे यामधुन विद्यार्थी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत अभ्यासावर लक्ष केंद्रीत करतो, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. 
भारतीय स्वातंत्रयाच्या अमृतमहोत्सव आणि येत्या प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे व छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या वतीने विद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी   स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव-  धनंजय पाटील, प्राचार्य- पी.एन. पाटील, उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोनि- उस्मान शेख, सपोनि-   सुर्वे, पोउपनि श्रीमती- गोडगे, पोलीस अंमलदार- शिंदे, पाटील, पुरके, चव्हाण, जाधवर, मुगळे, भोत्रे यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  कोविड काळामध्ये शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल फोनद्वारे डिजिटल माध्यमातून शिक्षण घ्यावे लागल्याने त्या काळात विद्यार्थी सोशल मीडियाशी जोडले गले. परंतु आपली वैयक्तिक माहिती जपून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा काळजीपुर्वक वापर करावा. तसेच ओटीपी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये असे आवाहन करुन यावर्षीपासून जिल्ह्यात डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या माध्यमातून 15 विद्यार्थ्यांची निवड केली असल्याचेही त्यांनी सांगीतले. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने लवकरच स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाअंती पोनि-  उस्मान शेख यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश विशद करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धा महत्तवपुर्ण असल्याचे सांगून विद्यार्थी- शिक्षकांचे त्यांनी आभार व्यक्त करुन देशभक्ती गीताचे गायन करुन त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.


 
Top