उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ.बच्चू कडू यांना उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाने 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार कडू कोर्टात सुनावणीला हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने अटक वॉरंट काढले होते त्यात कडू हजर झाल्यानंतर कोर्टाने दंड सुनावला.

 यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास थेट जामीन रद्द करण्याची तंबी जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली तसेच हे प्रकरण कडू हजर न झाल्याने गेली 4 वर्ष प्रलंबित असल्याने न्यायाधीश गुप्ता यांनी खडेबोल सुनावले. यापुढे तारखेला वेळेवर हजर राहावे व सहकार्य करावे, अति आवश्यक काम असेल तर वकील मार्फत कळवावे असे सांगितले. या प्रकरणात ऍड महेंद्र देशमुख यांनी सरकारची बाजू मांडली.

 कडू यांच्यासह अन्य 3 आरोपीना सुद्धा दंड सुनावला, 2019 मध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आंदोलन करण्यात आले या आंदोलन दरम्यान कडू व अधिकारी यांचा वाद झाला होता त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला होता. अपंग निधी अखर्चित राहिल्याने प्रहारच्या कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केले होते यावेळी कडू स्वतः हजर होते व त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते त्यात प्रहारचे मयूर काकडे, बलराज रणदिवे, कसबे हे आरोपी होते.


 
Top