उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवनी प्रमाणे आम्ही का करत असल्याचे गद्दार सांगत आहेत. मात्र, बाळासाहेब ठाकरे, दिघे यांचेे विचार गद्दारी शिवकत नाहीत. या गद्दारांना मोदीच्या विचाराने आणि अमित शाहच्या शिकवनीने गद्दारी करण्यास भाग पाडले असल्याचा घणाघात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी केला.

शिवसेना धाराशिव तालुकाप्रमुख सतिश सोमानी यांच्या वतीने आज शहरातील पवनराजे कॉम्पलेक्स येथील समर्थ सभागृहात शिवसैनिकाच्या सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापीठावर माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, जिल्हा युवा अधिकारी अक्षय ढोबळे, कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, तुळजापूर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, वाशी तालुकाप्रमुख विकास मोळवणे, जिल्हा बँकेचे संचालक देसाई आदिंची उपस्थिती होती. यावेळी आमदार कैलास घाडगे - पाटील हे बोलत होते.

 प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. धाराशिव तालुक्यातील सदस्य नोंदणीचे अर्ज यावेळी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाप्रमुख कैलास घाडगे - पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.   प्रास्ताविक करताना शिवसेना धाराशिव तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमानी यांनी केले. यावेळी धाराशिव तालुक्यातील सदस्य नोंदणीसाठी परिश्रम घेणारे सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुखांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शिवसेना कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, नितीन शेरखाने, युवासेना विभागीय सचिव तथा जिल्हा युवा अधिकारी अक्षय ढोबळे , भारत इंगळे यांनीही मेळाव्यास मार्गदर्शन केले. 

यावेळी तालुक्यातील मेंढा येथील उपसरपंच महादेव ढोरमारे,  ग्रा. प. सदस्य फुलचंद भगवान माळी, सांगवी येथील श्रीमंत चंद्रकांत पाटील, धनंजय बनसोडे, कमलाकर शिंदे, लासोना येथील आबाजी यादव, मंगेश बाबाहरी पाटील, धुत्ता येथील ग्रा. प. सदस्य अमोल मस्के, युवराज पिंपरे, जिकर शेख, जितेंद्र शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या गळ्यात भगवे रुमाल घालून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमिर शेख यांनी केले. या मेळाव्यासाठी धाराशिव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


खा. ओमराजे व आ. कैलास पाटील यांनी  मान उंचावली  - मकरंद राजेनिंबाळकर

सध्या शिवसेनेसाठी संघर्षाचा काळ आहे. पण संघर्ष हा शिवसेनेसाठी कांही नविन नाही. आपला संघर्ष हा विकृत मानसिकतेसाबेत आहे. भाजपा ईडी, सीबीआय या सारख्या यंत्रणाचा वापर करुन विरोधकांना त्रास देवून, खोके देवून भाजपामध्ये प्रवेश घेत आहे. धाराशिव जिल्ह्याच्या नावाला कलंक लावण्याचे काम कांही गद्दारांनी केले. मात्र, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहून धाराशिवकरांची मान उंचवण्याचे काम केले. भगवान के घर देर है अंधेर नही या म्हणी प्रमाणे या खोके सरकारने कितीही वेळकाढू पण केला तर कोर्टात शेवटी शिवसेनेचाच विजय होणार असल्याचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले.  

 
Top