उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यात दि. 31 जुलै 2022 ते 09 ऑगस्ट 2022 या कालावधीत मोहरम सण, दि. 01 ऑगस्ट 2022 रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती आणि दि. 02 ऑगस्ट 2022 रोजी नागपंचमी हे सण-उत्सव साजरे होणार आहेत. हे सण-उत्सव जिल्ह्यात शांततेत पार पडावे यासाठी सणाच्या वेळी वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करणे आवश्यक आहे.दि. 30 जुलै 2022 रोजीचे रात्री 00:01 वा. ते दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजीचे रात्री 24:00 वाजे पर्यंत हे आदेश अंमलात राहतील, असे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जारी केले आहेत.
सडकांवरील किंवा सडकेने जाणा-या मिरवणुकीतील जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणुक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गानी जाव्यात किंवा कोणत्या मार्गांनी जावू नयेत ते मार्ग विहीत करणे. सर्व मिरवणुकीच्या आणि जमावांच्या प्रसंगी तसेच प्रतिमा पूजनाच्या कोणत्या सर्व जागांच्या आसपास प्रतिमा पूजनांच्या वेळी आणि कोणत्याही सडकेवरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी, गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल अशा सर्व ठिकाणी अडथळा होवू न देणे, सर्व रस्त्यांवरील, नद्यांचे घाटांवर सार्वजनिक ठिकाणी, स्नानांचे, कपडे धुण्याचे ठिकाणी जागेमध्ये बंदोबस्त तसेच सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात सडकेजवळ किंवा सार्वजनिक जागेत आणि जागेजवळ वाद्य वाजविणे आणि शिंगे, कर्कश वाद्य वाजविणे यावर नियमन करणे, अगर त्यावर नियंत्रण ठेवणे, तसेच सर्व ठिकाणी अडथळा होवू न देणे.अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 33, 34, 37 ते 41 या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक ओदशांचे अधिन असलेले आणि त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे, जो कोणी वरील नियमनात्मक आदेशांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करेल तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही श्री. कुलकर्णी यांनी कळविले आहे.