उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 खरीप हंगाम 2022 करिता सोयाबीन बियाणे पेरणीबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आवाहन केले आहे की, 75 ते 100 मि.मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लॅटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्के पेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. पेरणीपुर्वी प्रती किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम आणि पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे आणि नंतर त्याची पेरणी करावी.  बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे.

शेतक-यांनी खरीप २०२२ मध्ये पेरणीसाठी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरावे, पेरणीपूर्वी बीजप्रक्रीया करावी, चांगली ओल म्हणजे 75 ते 100 मि.मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

 
Top