उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2022-2023 या आर्थीक वर्षामध्ये एरंडवाडी ते पापनास (चोराखळी) रस्ता ता.कळंब जि.उस्मानाबाद समाविष्ट करावा यासह अन्य मांगण्साचे निवेदन  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांना दिले. 

गडाख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  मौजे पापनास (चोराखळी) हे गांव राजमाता आहिल्याबाई होळकर यांचे आजोळ असून सदर गाव तीर्थक्षेत्र “क” मध्ये आहे. या परिसरात प्राचीन काळातील सर्वात मोठे पापनास मंदीर आहे. सदर मंदीराच्या दर्शनासाठी वर्षभर लाखो भाविक येतात परंतू मंदीराकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. एरंडवाडी हे गाव टेंभूर्णी-बार्शी-लातूर (राष्ट्रीय महामार्ग 465) या रोडवर असून पापनास (चोराखळी) गावाकडे जाण्यासाठी शेलगांव (जहागीर) या गावाहून जावे लागते. सदर रस्ता दोन तालुक्यास जोडणारा व धाराशिव साखर कारखाण्याकडे जाणारा हा महत्वाचा रस्ता आहे.

तरी सन 2022-2023 या आर्थीक वर्षामध्ये एरंडवाडी ते पापनास (चोराखळी) हा रस्ता समाविष्ट करुन भाविकांची, शेतकऱ्यांची व येथील जनतेची होणारी प्रचंड गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे. 

 
Top