उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पीक नुकसानीपोटी मंजुर करण्यात आलेला विमा सोमवारपासून (दि. ६) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

बजाज अलायन्झ कंपनीच्या कृषी विभागाचे देशाचे प्रमुख आशिष अग्रवाल यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आश्वासीत केले असल्याचे सांगण्यात आले. नुकसान भरपाईची रक्कम साधारणत: रुपये १५ ते १८ हजारच्या दरम्यान राहणार आहे. पावसातील खंड व अतिवृष्टीमुळे खरीप २०२१ मध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. प्रत्यक्षात रक्कम खात्यावर जमा झाल्यानंतर कृषी आयुक्तांना भेटणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

 
Top