उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बजाज कंपनीच्या कार्यालयावर जाऊन शेतकऱ्यांकडून बजाज कंपनीच्या बॅनरची होळी करण्यात आली तसेच होळी करून शेतकऱ्यांनीही बोंबाबोंब आंदोलन करून संताप व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की बजाज विमा कंपनी हरित गुन्हे दाखल करण्यात यावेत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व मंडळांना 80% विमा मंजूर करण्यात यावा भविष्यात बजाज विमा कंपनीला उस्मानाबाद जिल्ह्याचे विमा टेंडर रद्द करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.