तुळजापूर / प्रतिनिधी-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कटकरु नका, या मागणीसाठी सोमवार दि. २९ रोजी ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान महावितरणच्या अधिकारी, पदाधिकारीयांनी सांगितले की, आम्हाला वरुन आदेश आल्याने थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कट करीत असुन थकबाकीदारांनी दहा टक्के तरी रक्कम भरावी म्हणजे आम्ही वीज कनेक्शन तोडणार नाही असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरीस संघटनेला दिले.
यावेळी नेताजी जृमदाडे काञी: यावेळी जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे,ता, अध्यक्ष नेताजी जमदाडे ता, अध्यक्ष दुर्वास भोजने ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हाके व स्वाभिमानी संघटनेचे शेकडो पदाधिकारी सह गंधोरा काञी कामठा आपसिंगा सह पंचक्रोषीतील अनेक गावचे शेतकरी उपस्थितीत होते