उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे विमा कंपनी मार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन तक्रार दाखल करताना शेतकरी बांधवांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पिकविमा प्रतिनिधी यांच्याकडे ऑफलाईन तक्रार दाखल करत आहेत. 

पंचनामे करणारे विमा कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी नुकसान भरपाईच्या फॉर्मवर फक्त शेतकऱ्याचे नाव टाकून कोऱ्या फॉर्मवर कोणतीही नुकसान भरपाईची आकडेवरी न टाकता शेतकऱ्यांच्या सह्या घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. आपण कोऱ्या फॉर्मवर सही केल्यास आपल्या सहीचा फॉर्मवर विमा कंपनीचे अधिकारी आपले झालेले नुकसान कमी दाखवून आपल्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित ठेवू शकतात. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी पिक विमा योजनेच्या फॉर्म वर आपली पूर्णपणे नुकसान भरपाईची टक्केवारी आणि योग्य रित्या संपूर्ण फॉर्म भरलेली पडताळणी केल्याशिवाय सही करू नये,असे आवाहन आ कैलास पाटील यांनी केले.


 
Top