उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील शेतकरी माणिक लक्ष्मण गायकवाड वय ( 71 ) हे मंगळवार दि.11 मे रोजी सकाळी साडे-अकरा वाजण्याच्या सुमारास जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी विहिरीतुन पाणी काढत असताना त्यांचा पायरीवरुन तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यु झाला. मयत शेतकऱ्याचे पुतणे गणेश हरिदास गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तामलवाडी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी माणिक गायकवाड यांच्या पश्चात, पत्नी, दोन भाऊ, पाच मुली, एक मुलगा, सुना नातवंडे असा परिवार आहे. सदर घटनेचा तपास बीट अंमलदार गोरोबा गाढवे हे करित आहेत. 

 
Top