तुळजापूर/ प्रतिनिधी- 

तालुक्यातील बोरमण तांडा, जळकोट येथे पिण्याच्या पाण्यासाठी एकच जुनी बांधकाम केलेली टाकी असून या टाकीत एका बोअरवेलचे पाणी सोडण्यात येते. तेही लाईट असल्यावर, लाईटही फक्त आठच तास असते.

 अशा परिस्थितीत जवळपास एक हजार त बाराशे लोकसंख्या असलेल्या या बोरमण तांड्यातील पाण्याच्या एकाच टाकीवर ,पाणी भरण्यासाठी महिला व नागरिकांची  मोठी गर्दी होत होती.ही बाब मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा जळकोट ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी या ठिकाणी नुकतीच भेट देऊन पाहणी केली व याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत ग्रामविकास अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या.ग्रामविकास  अधिकारी श्री.पारे यांनी तातडीने यंत्रणा राबवून  नवीन पाण्याची टाकी व पाईपलाईनची व्यवस्था केली.

 नवीन टाकी बसवून घेऊन पाणीपुरवठा सुरू केला.यामुळे जुन्या पाण्याच्या टाकीवरील भार व गर्दी कमी झाली.परिणामतः लोकांना पाण्यासाठी दूरवर रांगा लावायची गरज उरली नाही.     त्यामुळे   जळकोट,बोरमण तांडा आणि परिसरातील नागरिकांतून कौतुक होत आहे.

 
Top