परंडा / प्रतिनिधी :-

शासन स्तरावरून दि.२० मार्च २०२१ पासून बीडीएस प्रणाली (बजेट डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम)   प्रणाली बंद आहे ती चालू करण्याचे अनुषंगाने प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने वित्त सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांना निवेदनाद्वारे(ई-मेल) मागणी केली आहे.

बीडीएस प्रणाली बंद असल्याने राज्यातील कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम मागणी प्रस्ताव महिना भरापासून रखडलेले आहेत.त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.काही शिक्षक व शिक्षकांचे कुटुंबिय कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोनाने संक्रमित झाल्याने दवाखान्यात उपचार घेत आहेत. दवाखान्याचे बील भरण्यासाठी भ.नि.नि.रक्कम मागणीचे प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केले आहेत परंतू बीडीएस अभावी भ.नि.नि रक्कम मिळेना त्यामुळे शिक्षकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.मुला-मुलीच्या लग्नाचा प्रश्न शिक्षकां समोर “आ” वासून बसला आहे.सेवानिवृत्त कर्मचा-यांचे भ.नि.नि रक्कमा शासनाकडे अडकून पडल्या आहेत,कोरोना सारख्या महामारीत देखिल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपले हक्काचे पैसे मिळेनात त्यामुळे उपचारांचा खर्च करण्यास पैसे नाहीत ही नामुष्की सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांवर ओढावली आहे.

बीडीएस प्रणाली चालू करून रखडलेली जीपीएफची प्रकरणे निकाली काढावीत यासाठी प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष विकास घुगे, सरचिटणीस संजय बागडी, राज्य संपर्क प्रमुख संतोष राजगुरू, राज्य समन्वयक दत्तात्रय पुरी हे वित्त सचिवांकडे ‌सातत्याने पाठपुरावा करत आहेत.अशी माहिती जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा समन्वयक फिरोज शेख, सचिव दत्तात्रय राठोड, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, उपाध्यक्ष हनुमंत माने, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, जिल्हा प्रवक्ता धनंजय आंधळे, जिल्हा संघटक योगेश चाळक यांनी दिली आहे.


 
Top