उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 तुळजापूर येथील राजेंद्र भारत पोतदार यांची दुचाकीला अडकवलेली चार किलो चांदीचे दागिने असलेली पिशवी चोरट्याने लंपास केली. ही घटना दि.९ रोजी सायंकाळी घडली. राजेंद्र पोतदार यांनी त्यांची दुचाकी अग्रवाल किराणा दुकानासमोर उभी करून खरेदीसाठी दुकानात गेले होते. यावेळी दुचाकीच्या हॅन्डलला चांदीचे दागिने असलेली पिशवी अडकवलेली होती. अज्ञाताने संधी साधून त्यांच्या मोटारसायकलच्या हॅन्डलला अडकवलेली चार किलो ग्रॅमचे चांदीचे दागिने असलेली पिशवी चोरुन नेली. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 
Top