उस्मानाबाद/ प्रतिनिधी
राज्यातील व जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू आहे. आज अखेर एकूण 68 हजार 665 लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी दिनांक 16 जून 2020 पर्यंत 54 हजार 283 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून त्यापैकी 52 हजार 30 शेतकऱ्यांचे कर्ज खात्यावर रक्कम रुपये 384 कोटी 97 लाख रक्कम जमा करण्यात आलेली आहे.
कोविड-19 मुळे काही दिवसाकरीता MJPSKY ऑनलाईन पोर्टल बंद ठेवण्यात आले होते. हे पोर्टल दिनांक 17 जून 2020 पासून चालू करण्यात आले आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी सामाजिक अंतरा (Social Distance) चे पालन करुन आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आधार प्रमाणीकरण प्रक्रिया दरम्यान कर्जखाते रकमेत कोणतीही तफावत असल्यास “ रक्कम अमान्य “ पर्याय उपयोगात आणण्यापूर्वी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून कर्ज रकमेची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उस्मानाबाद व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.
राज्यातील व जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू आहे. आज अखेर एकूण 68 हजार 665 लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी दिनांक 16 जून 2020 पर्यंत 54 हजार 283 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून त्यापैकी 52 हजार 30 शेतकऱ्यांचे कर्ज खात्यावर रक्कम रुपये 384 कोटी 97 लाख रक्कम जमा करण्यात आलेली आहे.
कोविड-19 मुळे काही दिवसाकरीता MJPSKY ऑनलाईन पोर्टल बंद ठेवण्यात आले होते. हे पोर्टल दिनांक 17 जून 2020 पासून चालू करण्यात आले आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी सामाजिक अंतरा (Social Distance) चे पालन करुन आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आधार प्रमाणीकरण प्रक्रिया दरम्यान कर्जखाते रकमेत कोणतीही तफावत असल्यास “ रक्कम अमान्य “ पर्याय उपयोगात आणण्यापूर्वी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून कर्ज रकमेची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उस्मानाबाद व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.