उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील परमेश्वर भारत जाधव व राजश्री वामन शेटे या नवदांपत्यांनी लग्न कार्यातील अनावश्यक खर्च टाळून, सामाजिक अंतर व इतर सर्व नियम पाळून आई-वडील यांच्या उपस्थितीत घरीच लग्नकार्य केले आहे.
हे दोघेही उच्चशिक्षित असून कोरोनाग्रस्तासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी 11 हजार 100 रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला.
 
Top