परंडा / प्रतिनिधी -
परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथिल एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दि.२६ रोजी सामुहीक बलात्कार झाल्याची घटणा घडली असुन अंभी पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने पिडीत मुलीने दि.२८ रोजी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्या कडे तक्रार दाखल करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
परंडा तहसिलदार यांच्या मार्फत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ओळखीचा फायदा घेत दोन तरूणांनी दि.२६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घरासमोरून तोंडाला रुमाल बांधुन बळजबरीने मोटार सायकलवर गावा पासुन दोन किमी अंतरावर घेऊन गेले व आळी पाळीने बलात्कार करून कोणास सांगीतल्यास तुझ्या सह तुझ्या कुटूंबाला मारून टाकु अशी धमकी देऊन निघुन गेले .
झाला प्रकार मुलीने घरी येऊन आई वडीलांना सांगितल्यावर रात्रीच अंभी पोलिसात फिर्याद देण्यासाठी गेले मात्र पोलिसांनी फिर्याद दाखल न करता मुलीला पोलीस ठाण्यात ठेऊन घेतले व आई वडीलांना घरी पाठविले.
दुसऱ्या दिवशी पोलिसांना पीडीत मुलीने दोघानी बलात्कार केला असल्याचे सांगून देखील पोलिसांनी मुलीला धमकावत आम्ही सांगू तसेच जवाब दे असे म्हणत केवळ एका आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला व पीडितेला धमकावत मेडीकल तपासणी करायची नाही, अशी लेखी घेतली असा अारोप तक्रारीत केला असुन दोन्ही आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा व आरोपींना पाठीशी घालनाऱ्या गुन्हा दाखल करावा असे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच आरोपी कडून व अंभी पोलिसा कडून मला व माझ्या कुंटूबाला त्रास होण्याची शक्यता असून आमचे काही बरे वाईट झाल्यास त्यांना जबाबदार धरावे व मला न्याय द्यावा अन्यथा मी केव्हाही आत्मदहन करीन, असे पिडीत मुलीने तक्रारीत म्हटले आहे .
परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथिल एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दि.२६ रोजी सामुहीक बलात्कार झाल्याची घटणा घडली असुन अंभी पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने पिडीत मुलीने दि.२८ रोजी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्या कडे तक्रार दाखल करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
परंडा तहसिलदार यांच्या मार्फत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ओळखीचा फायदा घेत दोन तरूणांनी दि.२६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घरासमोरून तोंडाला रुमाल बांधुन बळजबरीने मोटार सायकलवर गावा पासुन दोन किमी अंतरावर घेऊन गेले व आळी पाळीने बलात्कार करून कोणास सांगीतल्यास तुझ्या सह तुझ्या कुटूंबाला मारून टाकु अशी धमकी देऊन निघुन गेले .
झाला प्रकार मुलीने घरी येऊन आई वडीलांना सांगितल्यावर रात्रीच अंभी पोलिसात फिर्याद देण्यासाठी गेले मात्र पोलिसांनी फिर्याद दाखल न करता मुलीला पोलीस ठाण्यात ठेऊन घेतले व आई वडीलांना घरी पाठविले.
दुसऱ्या दिवशी पोलिसांना पीडीत मुलीने दोघानी बलात्कार केला असल्याचे सांगून देखील पोलिसांनी मुलीला धमकावत आम्ही सांगू तसेच जवाब दे असे म्हणत केवळ एका आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला व पीडितेला धमकावत मेडीकल तपासणी करायची नाही, अशी लेखी घेतली असा अारोप तक्रारीत केला असुन दोन्ही आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा व आरोपींना पाठीशी घालनाऱ्या गुन्हा दाखल करावा असे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच आरोपी कडून व अंभी पोलिसा कडून मला व माझ्या कुंटूबाला त्रास होण्याची शक्यता असून आमचे काही बरे वाईट झाल्यास त्यांना जबाबदार धरावे व मला न्याय द्यावा अन्यथा मी केव्हाही आत्मदहन करीन, असे पिडीत मुलीने तक्रारीत म्हटले आहे .