धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि.च्या वतीने सन 2025- 2026 च्या द्वितीय गळीत हंगामात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत गाळपासाठी आलेल्या ऊसाचे बिल (दि.16) संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे.
एनव्हीपी शुगर कारखान्याचे हित डोळ्यासमोर ठेवून पंधरवाडा पूर्ण होताच संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात ऊसबिल जमा करण्यात आले. विशेष म्हणजे तिसर्या पंधरवाड्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात कारखान्यात उत्पादित झालेल्या 1 लाख जागरी पावडर पोत्यांचे पूजनही कारखान्याच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले होते. यंदाच्या हंगामात ऑक्टोंबर महिन्यात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून चाचणी गळीत हंगामाप्रमाणेच यंदाच्या गळीत हंगामातही पंधरा दिवसांत शेतकर्यांना ऊसबिल देण्याची परंपरा कायम जोपासली आहे. त्यामुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ज्या शेतकर्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिलेले आहे त्यांनी बँकेत जावून आपले बिल घ्यावे. तसेच ज्या शेतकर्यांनी अद्याप बँक खाते दिलेले नाही, त्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लि. धाराशिव बँकेत ऊसाचे बिल घेवून जावे, असे एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांनी कळविले आहे.
