उमरगा (प्रतिनिधी)- राजकारण हे श्रीमंत व धनवान होण्याचा मार्ग आहे हा समाजमनातील चुकीचा समज दूर करून गुणवंतांनी समर्पित असा सेवाभाव समोर ठेवावा तेव्हाच राष्ट्र घडेल. यासाठी युवकांनी राजकारणाकडे सेवा म्हणून पहावे व्यवसाय म्हणून नको. आपल्या महापुरूषांच्या मार्गाने आचरण केल्यास समृद्धपणे जगता येते. तसेच शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीला प्राधान्य देऊन बारावीनंतरचे शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन केले.
उमरगा शहरातील श्रीराम मंगल कार्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान व सरस्वती बहुउद्देशीय सामाजिक संस्था उमरगा यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्धी जयंतीनिमित्त धनगर समाजाच्या इयत्ता दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून डॉ सारिका बेडदुर्गे होते. कार्यक्रमाचे व्याख्याते जालना येथील समाज प्रबोधनकार दीपक बोराडे व युवा सेना मराठवाडा निरीक्षक शिवसेना शिंदे गट ॲड आकांक्षा चौगुले यांनीही विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये समाजातील मान्यवराचा विशेष सत्कारही आयोजित करण्यात आला होता.
यांचा झाला सत्कार
सुजाता बिरू माशाळे, अजय जीवन गडदे, राजकुमार कागे, वैष्णवी गोपाळ शेंडगे, विश्वंभर भुरे, प्रा. सुभाष गावडे, सुवर्णा दिगंबर दूधभाते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कार्यक्रमांमध्ये दहावी व बारावी परीक्षेत विशेष गुण संपादन केलेल्या 100 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेना जिल्हाप्रमुख लातूर सचिन दाणे, कमलाकर दाणे जिल्हाध्यक्ष शिवसेना (शिंदे गट), माजी प्राचार्य देवाप्पा सूर्यवंशी, उद्योजक विष्णू बिराजदार, प्राचार्य सविता मुरूमकर, राहुल शिंदे, अनिल सगर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ अनिल गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ विजयकुमार बेडदुर्गे, डॉ विक्रम जीवनगे, युवा उद्योजक अमर जाधव, कमलाकर मोटे व संतोष सुरवसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राघवेंद्र गावडे व सरस्वती बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष राजू धनगटे, प्रा संदीप दूधभाते, शिवदास कुलकर्णी, तानाजी घोडके, शिवदास कुलकर्णी, शिवाजी गावडे, गुंडू दूधभाते, जालिंदर सोनटक्के,ज्योती बनसोडे, कालींदा घोडके, सुनिता भुरे, कविता घोडके, लक्ष्मण बनसोडे, गोपाळ घोडके, विकास दुधभाते,अर्जुन बनसोडे, माजी प्राचार्य देवाप्पा सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्रीमती पांढरे,श्रीधर जोगे व शाहुराज हुलगे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार डॉ आर डी शेंडगे यांनी मानले. तालुक्यातील समाज बांधव व उपस्थित होते.