धाराशिव (प्रतिनिधी)- अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे इसवी सन 1725 रोजी महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते.शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सामाजिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे.त्यांचे कार्य हे भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल इतके महान आहे. भारतातील ळव्याच्या तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून त्या ओळखल्या जातात.असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.
धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ. संदीप देशमुख , आदिसह सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकिय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.