भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे महसूल विभागाच्या वतीने तालुक्यातील काही भागांमध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा करण्यास सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील फळबागा, कांदे, पत्ता कोबी, केळी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच काही मंडळामध्ये अतिवृष्टी निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील काही भागांमध्ये कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी हे संयुक्त मिळून पंचनामाचे काम चालू आहे .गुरुवारी झालेल्या पावसाने सावरगाव ते पिंपळगाव बार्शी ,व माणकेश्वर भांडगाव बार्शी या रस्त्यावरील तात्पुरत्या स्वरूपाचे पूल वाहून गेले आहेत .पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अद्यापही या दोन्ही मार्गावरील वाहतूक सेवा बंद आहे .त्यामुळे नागरिकांना देवळाली बार्शी ,व वरदवाडी बार्शी या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे ग्रामीण भागातील वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे होऊन शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.