भूम (प्रतिनिधी)- आरसोली मध्यम प्रकल्पातून भूम नगर परिषद साठी होणारी दुसरी पाईपलाईनचे काम वंजारवाडी सह इतर गावकऱ्यांनी थांबवले. दुसरी पाईपलाईन नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे . मागील आठवड्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करूनही काल रात्री पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम चालू ठेवले .त्यावेळी गावातील शेतकऱ्यांनी येऊन पाईपलाईनचे काम बंद पाडले. भूम शहरासाठी अमृत दोन या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम चालू करणार होते .त्यावेळी शेतकऱ्यांनी येऊन होणारी दुसरी पाईपलाईन होऊ दिली नाही .वंजारवाडी, हाडोग्री, हिवरा,आरसोली,दिंडोरी, सावरगाव या गावांचा भूम वाशी येथे जाणाऱ्या पाईपलाईनला विरोध आहे .या सर्व गावांची शेती आरसोली मध्यम प्रकल्पातील पाण्यावरच अवलंबून आहे .भूम शेजारील बाणगंगा किंवा वाकवड तलावातून ही पाईपलाईन करावी .वंजारवाडी गावातील 50 टक्के शेतकरी अद्यापही पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत .रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणारे पाणी गावातील काही क्षेत्रालाच मिळते व इतर क्षेत्र तसेच राहते .असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे .त्यासाठी आज वंजारवाडी ग्रामपंचायत समोर शेतकऱ्यांच्या वतीने पाणीपुरवठा च्या पाईपलाईन ला विरोध करत निदर्शने केली.
यावेळी यावर सह्या करणारे प्रभाकर डोंबाळे प्रताप पाटील,राजेद्र मिसाळ, बालाजी सावंत, सदीप मगर, प्रशांत कदम, विलास पाटील, सुधिर क्षीरसागर ,राम सावंत, सधीर वाघमारे, शैलेश काळे, शाहाजी जगदाळे, शेषेराव मिसाळ, शेषेराव बर्वे, आमोल डोंबाळे, रविद्र लोमटे, भाऊ काळे, नाना मोटे, वैभव मोटे, सर्जेराव डोंबाळे, राजेद्र गपाट आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.