तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील आरळी ब्रु शिवारात सोमवार दि. 24 मार्च रोजी दुपारी 4.30वा वीस मिनीटे झालेल्या गारांचा पावसात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
यात आरळीब्रुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी प्रशांत व्हरकट हे मागील बारा ते तेरा वर्षापासुन सेंद्रिय पध्दतीने आंबा पिक घेतात. त्यांचा शेतात सेंद्रिय पध्दतीने 120 केशर आंबा झाडे लागवड केली असुन सध्या काढणीला आलेला पाडाचा केशर आंबा सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी वादळवा-या सह गाराचा पावसात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. 120 आंबा झाडा वरील सत्तर टक्के आंबा गळुन पडला असुन तीस टक्के आबा झाडावर राहिला आहे. यात प्रशांत व्हरकट यांचे तीन ते साडे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. तसेच नागनाथ बचाटे यांच्या शंभर आंबा झाडाचे यात मोठे नुकसान झाले आहे.