धाराशिव (प्रतिनिधी)- दशमान गोसावी समाजातील मयत युवक माऊली गिरी राहणार दुधोडी तालुका भूम यांच्यावर झालेल्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भूम तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सकल दशमान गोसावी आणि भटके मुक्त समाज बांधवांनी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
माऊली बाबासाहेब गिरी राहणार दुधवडी ता. भूम जिल्हा धाराशिव हा गरीब भटके मुक्त गोसावी समाजाचा असून त्याला खोट्या प्रकरणावरून अमानुष मारहाण करण्यात आली त्याला क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे आरोपी हे जवळच राहणारे सतीश जगताप सह सहा ते आठ आरोपिंनी ३/३/२०२५ रोजी मुलास मारहाण केले असून त्याला सोलापूर येथे उपचारासाठी ऍडमिट केले होते त्यादरम्यान तो १३ दिवसांनी मयत झाला असून उपचारादरम्यान चार वेळेस डायलेसिस दिले होते परंतु त्याला हाताला व पोटाला तसेच किडनीला अमानुष मारहाण झालेले असल्यामुळे व त्याचे गुप्त अंगाला जास्त मारहाण असल्याने तो मयत झाला त्याला आई-वडील त्यांना तो एकमेव मुलगा होता तसेच घरची गरिबीची हालाखीची परिस्थिती असल्याने कुटुंबावर अत्यंत मोठा आघात झाला आहे यापूर्वी आरोपीवर होण्याची नोंद झाली असून त्यामध्ये साधारण गुन्ह्याची नोंद केलेली असल्याने आरोपीविरुद्ध खुनाचा व इतर सर्व गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ अटक करून आरोपीवर मकोका,अपहरण खंडणी व इतर गुन्हे सीआयडीमार्फत चौकशी करून नोंद करावेत मैताचे कुटुंबीयास शासकीय आर्थिक मदत मिळावी तसेच कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व सदरील घटनेची गांभीर्याने दखल घेण्याकरिता व कुटुंबाचे संरक्षण होण्याकरिता अशा प्रकारचे गुन्हे वारंवार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाकडे सदरील घटनेबाबत आमच्या भावना पोहचवाव्यात असे मोर्चाकरांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर ॲड .राजेंद्र बंन संस्थापक अध्यक्ष दशनाम गोसावी समाज परिषद बीड, साहेबराव गोसावी खानदेश अध्यक्ष,बाजीराव गिरी,रंगनाथ पैठणकर, ओमप्रकाश गिरी, संजू भारती, संपत पुरी, भगवान गोसावी, उमेश जोगी, किरण भारती, वासुदेव गोसावी, संजय गोसावी यांच्यासह अन्य लोकांच्या सह्या आहेत.