धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी समाजातील मराठा तरुण आक्रमक बनत असून काही युवक मराठा आरक्षणामुळे  शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याच्या कारणाने नैराश्यात जाऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारला नेमके आणखी किती बळी घ्यायचे आहेत अशी लोकभावना तयार होत आहे. कळंब तालुक्यातील दहिफळ येथे गुरुवार (दि. 4 जानेवारी) रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रोहण राजेंद्र भातलवंडे या 19 वर्षाच्या मराठा तरुणाने चिठ्ठी लिहून शेतातील बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

याबाबत वृत्त असे की,दहिफळ येथील तरुण रोहण राजेंद्र भातलवंडे हा 10 वी पर्यंत शिक्षण घेऊन कृषी पदविका डिप्लोमा कोर्स केला आहे. नोकरीच्या शोधात फिरला परंतु कुठे नोकरीची संधी मिळाली नाही. म्हणून गावात दुधडेअरीचा व्यवसाय सुरू केला.दुधाचा व्यवसाय चालवत असताना स्वतः च्या तीन गायी सांभाळत होता. शिक्षणासाठी इतका खर्च होऊनही आपण शेवटी काय करतोय अशा विचाराने तो सतत बेचेन असायचा. निसर्गाच्या जीवावरची शेती अन बेभरवशाचा द्दुधाचा व्यवसाय दुधाचे दर कमी-जास्त होत होता.या व्यवसायात नफा कमी तोटा अधीक होत आहे हे लक्षात आले.आपण कृषी पदविका शिक्षण घेऊन काय फायदा झाला. कुठे नोकरीची संधी उपलब्ध होत नाही. जर आरक्षण असते तर आणखी शिक्षण घेऊन कुठंतरी संधी मिळाली असती. जवळच्या मित्रा जवळ बोलत तो सतत आपल्या विचारात एकांतात वावरत होता. 

मराठा आरक्षणासाठी मी बलीदान देत आहे. सरकारने जागे व्हावे व मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे असा मजकूर लिहून रोहण राजेंद्र भातलवंडे याने गळफास घेऊन जीवन संपविले आहे. ही घटना परिसरात कळाली सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये दत्ता नानासाहेब भातलवंडे यांनी फिर्याद दाखल केली. भातलवंडे यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकरी नातेवाईक उपस्थित होते. 


 
Top