धाराशिव (प्रतिनिधी) - ग्रामीण भागासह शहरी भागातील ही अनेक महिलांना वाव मिळत नाही. त्यामुळे महिलांसाठी बाईपण भारी हा चित्रपट जिल्ह्यात दाखविण्यात आला. त्यावेळी अनेक महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. महिलांच्या विविध गुणांना वाव देण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी मंगळागौरी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेतून सामाजिक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न राहिली अशी माहिती धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली.
लेडीज कल्बच्या मैदानावर होणाऱ्या मंगळागौरी स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 50 हजार रूपये, द्वितीय पारितोषिक 30 हजार रूपये, तिसरे पारितोषिक 20 हजार रूपये असे एकूण 1 लाख रूपयाचे आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तर महिला संघाला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी 500 रूपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. आता पर्यंत पुणे, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यातून 20 संघानी आपली नोंदणी केली आहे असे माहिती अर्चना पाटील यांनी दिली. अर्चना पाटील यांनी सांगितले की, मंगळागौर स्पर्धेतून समाजाला संदेश देण्याचा उपक्रम आम्ही राबवत आहोत. आम्ही राबवत असलेल्या महिलांचा उपक्रम पाहून विरोधक ही महिलांसाठी विविध कार्यक्रम घेत आहेत. आम्ही राबवत असलेल्या महिला उपक्रमाचे हे यश आहे असेही अर्चना पाटील यांनी सांगितले.