उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  मुंबई वसई येथील श्रद्धांजली वालकर या युवतीचा अमानुषपणे खून करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय एकता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.११ डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, श्रद्धा वालकर हिचा अतिशय निघृणपणे खून केला आहे. श्रद्धा वालकर हिचा खून करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आहेत. त्यामुळे असा खून करणारा क्रूर, राक्षसी वृत्तीचा व निर्दयी आफताब याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. तर महिलांच्या संरक्षणासाठी कडक कायदे करण्यात यावेत. तसेच अशाच घटना रोज देशात घडत असल्यामुळे राज्य व केंद्र सरकारने कडक धोरणे अंमलात आणावीत, अशी मागणी केली आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये अखिल भारतीय एकता पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ममता शर्मा, किशोर शिंदे, सत्यजित सुरवसे, शिवाजी सुरवसे, सिद्धार्थ सुरवसे, रंगनाथ तुपे, वृंदावनी गवळी, प्रमिला झोंबाडे, लक्ष्मी गायकवाड, अनिल गावसाने, दादा पवार, अनिल जाधवर आदींसह इतर  सहभागी झाले होते.


 
Top