उस्मानाबाद /प्रतिनिधी -

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने स्टार्टअप स्पर्धेचे जिल्हा स्तरीय आयोजन कण्यात आले होते. हि स्टार्ट अप यात्रा स्पर्धा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर उस्मानाबाद येथे दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती. कृषी, शिक्षण, आरोग्य,  कचरा व पाणी व्यवस्थापन, ई प्रशासन. स्मार्ट पायाभूत सुविधा व ईतर अशा विविध विभागामध्ये स्टार्ट अप प्रस्ताव मागवण्यात आलेल होते. त्या प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जयसिंगराव देशमुख होते. अध्यक्ष म्हणून विद्यापीठ उप परिसराचे संचालक मा. डॉ. डी के गायकवाड हे होते.या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. संजय गुरव, लघु उद्योग भारती मराठवाडा व उद्योजक श्री. संजय देशमाने, व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, लघु उद्योग भारती उस्मानाबादचे श्री. निशांत होणमुटे, श्री. आवताडे सर, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी व श्री. रिझवान कपूर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी उद्योग वाढीसाठी किंवा सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी नवीन दृष्टीकोन ठेवल्यास नवीन कल्पना सुचल्या जातात. नवीन कल्पना या मार्केट मधील गरजा व प्रश्न घेऊन विद्यार्थ्यांनी सोडवाव्यात असे मार्गदर्शन केले.

 द्वितीय सत्रात  . किरण झरकर , निर्देशक यांनी स्टार्ट अप बद्दल माहिती दिली.   रिजवान कपूर यांनी स्टार्ट अप यात्रा व सादरीकरण या बाबत मार्गदर्शन केले. सदर स्टार्ट अप जिल्हा स्तरीय स्पर्धेत ४५ स्पर्धकांची नोंदणी झाली होती, यातील २३ स्टार्ट अप प्रस्तावांची मांडणी केली. यातील प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके काढलेली आहेत. यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार असे बक्षीस दिले जाईल. तसेच पुढे विभागीय व राज्य पातळी वरती यांना संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना हे महत्वाचे व्यासपीठ मिळाले आहे.

 या सर्व स्टार्ट अप सादरीकरणचे महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसायटी मार्फत घालून दिलेल्या निकषा वरती मूल्यमापन केले गेले. सदर सादरीकरणाचे मूल्यमापन करण्यासाठी उद्योजक  संजय देशमाने, तंत्र शिक्षण विभागाचे प्रा. पंके सर, डी आय सी चे श्री. एन पी जावळीकर, व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव आणि गट निर्देशक श्री. मनोज चौधरी यांची समिती जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत गाठीत समितीने केले. अत्यंत उपयुक्त आणि उद्योग वाढीस बळ देणाऱ्या कल्पना सादर केल्या गेल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम शिंदे तर आभार प्रा. वरून कळसे यांनी मानले व कार्यक्रम नियोजन हे प्रा. सचिन बस्सैये यांनी केले. सदर कार्यक्रमच्या यशस्वी आयोजना साठी कौशल्य विकास व विद्यापीठ उप परिसर मधील शिक्षकव शिकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी कार्य केले. सदर कार्यक्रम मा. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या स्टार्ट अप स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे आहेत.


 
Top