तुळजापूर / प्रतिनिधी-
श्रीतुळजाभवानी मातेची अाश्विनीपोर्णिमे उत्सव विधी संपताच बुधवार दि.१२च्या पहाटे पासुन भाविकांना राजेशहाजीमहाध्दार मधुन देवीदर्नशनार्थ सोडले जात असुन यामुळे भाविकांची होणारी पायपीठ रुपी गैरसोय थांबणार आहे. तसेच नवराञोत्सवात बंद केलेले अँक्सेस झिरो पास पुनश्च सुरु केले असुन पास शिवाय भाविकांना देवीदर्शन घेता येणार नाही .
राजेशहाजी महाद्वारामधुन भाविकांना दर्शनार्थ सोडणे २५ सप्टंबर पासुन बंद केले होते. आजअखेर अठरा दिवसानंतर म्हणजे १२आँक्टोबरला राजेशहाजीमहाद्वार मधुन दर्शनार्थ सोडण्यास आरंभ केला आहे.