उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिक्षकांनी अध्यापन करताना आभासी जगतातील ज्ञान हे शेवटच्या थरातील विद्यार्थ्यांच्या बुद्धीपर्यंत पोहोचविले पाहिजे तेव्हाच विद्यार्थी हे भविष्यातील जबाबदार नागरिक होतील असे भावपूर्ण प्रतिपादन माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी केले.

  दिनांक २५ सप्टेंबर २०२२  रोजी शहरातील सांजा रोडवरील आर्यन फंक्शन हॉल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून धनेश्वरी शिक्षण समूहाचे जिल्हाभरातील गुणवंत 21 शिक्षकांना धनेश्वरी शिक्षकरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

  धनेश्वरी शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख व लातूर येथील  विभागीय शिक्षण कार्यालयाचे उपसंचालक डॉ.गणपतराव मोरे उपस्थित होते.तर उस्मानाबाद जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे,शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,राजश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय पाटील,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख,जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची उपस्थिती होती.हा पुरस्कार वितरण सोहळा धनेश्वरी शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

 पुढे बोलताना माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख पुढे म्हणाले की,विश्वास संपादन करून कर्तबगारीने वागवणूक देण्यासाठी सकारात्मक ध्येय बोली अपेक्षित असून शिक्षकांनी ज्ञान हे संशोधनात्मक द्यावे. भविष्यातील जबाबदार नागरिक तयार करण्यासाठी सुज्ञ शिक्षक तसेच पालक यांनी जागरूकतेने ज्ञान दिले पाहिजे. आपल्याला जुन्या पिढीने सुंदर जग दिले म्हणून यापेक्षा अधिक चांगले जगणं निर्माण करून मानवी जीवन समृद्ध बनवले पाहिजे.

 याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.गणपतराव मोरे म्हणाले की,सरकारचे गुणवंत शिक्षकांना पुरस्कार वितरण करताना मर्यादा येतात तेंव्हा धनेश्वरी शिक्षण समूहाने समाजातील गुणवंत शिक्षकांना धनेश्वरी शिक्षकरत्न पुरस्कार देण्याचे कार्य वाखण्याजोगे आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी नागरिकांनी चौकस बुद्धीचा वापर करून चालू घडामोडीचा आधार घेवून जगण्यातील आनंद घेतला पाहिजे असे म्हणून पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून अध्यक्षीय समारोप केला.

 यावेळी धनंजय रणदिवे, बाळकृष्ण तांबारे, डॉ. दयानंद जटनूरे यांनी मनोगतातून पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या पुरस्कार सोहळ्याचे प्रस्ताविक भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांनी धनेश्वरी शिक्षण समूहाने राबविलेले सामाजिक कार्य सांगितले.या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार प्राचार्य दत्तात्रय घावटे यांनी मानले.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीतील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनेश्वरी शिक्षण समूहाच्या सर्व प्राचार्य प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top