उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यात दि. 10 एप्रिल 2022 रोजी श्रीराम नवमी, दि. 14 एप्रिल 2022 रोजी महावीर जयंती, 14  ते दिनांक 30 एप्रिल 2022 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दि. 14 ते दिनांक 18 एप्रिल 2022 या कालावधीत श्री तुळजाभवानी चैत्री पौर्णिमा, दि. 16 एप्रिल 2022 रोजी हनुमान जयंती आणि दि. 15  ते  21 एप्रिल 2022 या कालवधीत श्री येडेश्वरी देवी चैत्री पोर्णिमा, दि. 25  ते  05 मे 2022 या कालावधीत तेरे येथे श्री संत गोरोबा काका यात्रा  व दि 26  ते 28 एप्रिल 2022 या कालवधीत सोनारी येथे श्री. काळभैरवानाथ यात्रा  हे सण, उत्सव, यात्रा साजरे होणार आहेत.

 या सण,उत्सव जिल्ह्यात शांततेत पार पाडावे, आणि वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमन  करण्यासाठी 10 एप्रिल  ते 5 मे  या कालावधीत मिरवणुकीतील किंवा  जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे त्यांची वर्तणूक आणि वागणूक कशी असावी तसेच अशा कोणत्याही मिरवणुका कुठल्या मार्गानी जाव्यात किंवा कोणत्या मार्गांनी जावू नयेत ते मार्ग विहीत जिल्हा पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी हे आदेश दिले आहेत. सर्व मिरवणुकीच्या आणि जमावांचे  सर्व जागांच्या आसपास प्रतिमा पुजनांचे वेळी आणि कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी, गर्दी होणार असेल अथवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल अशा सर्व ठिकाणी अडथळा होवू न देणे. याकडे पोलीसांनी लक्ष देणे गरजेचे आहे,असेही श्रीमती जैन यांनी आदेशात नमूद केले आहे.

    सर्व रस्त्यांवरील,नद्यांचे घाटांवर सार्वजनिक ठिकाणी, स्नानाचे, कपडे धुण्याचे ठिकाणी जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात सडके जवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविणे आणि शिंगे,कर्कश वाद्य वाजविणे यावर नियमन करणे, तसेच त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यत आवश्यक आहे.सक्षम अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कमल 33, 34, 37 ते 41 या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक ओदशांचे अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेशही द्यावेत या नियमनात्मक आदेशांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र  राहिल.असे श्रीमती जैन यांनी आदेश जारी केले आहे.

 
Top