तुळजापूर / प्रतिनिधी-
केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना लसीकरणात प्रधान्य देऊन शाळा महाविद्यालये सुरू करावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने बुधवार दि.८रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, जिल्हा सरचिटणीस मयूर दराडे, शहराध्यक्ष आदित्य शेटे, शहर उपाध्यक्ष विवेक खंदारे, शहर सरचिटणीस प्रवीण शेंडगे, कार्यध्यक्ष वीरेंद्र कदम, शहर संघटक मुर्तज मुलाणी, हरी खुरूद तसेच विद्यार्थी उपस्थितीत होते.