उस्मानाबाद / प्रतिनिधी

शहरातील रमाई आवास योजनेतील मंजुरी दिलेल्या ३४६ व तिसऱ्या हप्त्यातील २९ अशा  लाभाच्या हप्त्यासाठी लाभार्थी यांनी समाज कल्याण आयुक्त , जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद यांना १४६ जणांच्या सह्यानिशी लेखी निवेदन दिले,

रमाई आवास योजनेतील लाभार्थी यांना लाभ देण्यात आले परंतु अर्धवट कामामुळे व हप्ते मिळत नसल्याने लाभार्थी ऊन पाऊस वारा या परिस्थितीला तोंड देत घरकुल पुर्ण होण्यासाठी धडपडत आहेत,पावसाचे दिवस असल्याने राहावे कुठे असा प्रश्न निर्माण झाला असून कोरोनाच्या लाॅकडाऊन मुळे जनजीवन विस्कळित झाले आहे,नविन ३४६ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी देऊन त्यांचे बॅंक खाते उघडले असुन त्यांच्या खात्यावर आणखी रक्कम जमा झाली नाही,घरकुलाचा हप्ता मिळावा याकरिता आज रोजी नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले,यात प्रामुख्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंगुलभाऊ बनसोडे, नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,गट नेते नगर सेवक गणेश खोचरे,दत्ता पेठे,नगर सेवक बापू पवार,गणेश रानबा वाघमारे,मृत्युंजय बनसोडे,अशोक पेठे,संजय गजधने,हिमालय बनसोडे, सचिन धाकतोडे, सचिन वाघमारे, सचिन देडे,स्वराज जानराव यांच्या सहित लाभार्थी यांनी निवेदन दिले, सिध्दार्थ बनसोडे व दत्ता पेठे यांनी घरकुल साठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करुन लाभार्थी यांची होणारी हेळसांड विषयी माहिती दिली.

 
Top