उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशन मुंबई यांच्याकडून धान्य पुरवठा करून घेता ते रितसर व स्थानिक निवड झालेल्या स्थानिक महिला मंडळ, बचतगट ,  महिला संस्था यांच्याकडून हे धान्य घरपोच पुरवठा करून घ्यावे. माहे जुलै २०२० पासून कच्चे धान्य घरपोच करण्याचे काम  महिला मंडळ, बचतगट, महिला संस्था बचत गटाच्या मुळ यंत्रणेस पुर्ववत आदेश द्यावेत, अशी मागणी उस्मानाबाद महिला बचतगट महासंघाच्या वतीने जिलाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,   उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामीण अंगणवाडयांना   दि.१६/०३/२०२० पासुन गरम, ताजा आहार पुरविण्याचे काम आजतागात  कोरोना या महामारी मुळे बंद करण्यात आले आहे. माहे फेब्रुवारी २०२० मध्ये नवीन ई-निवीदा प्रमाणे आम्ही शहरातील अंगणवाडयांना गरम ताजा आहार पुरवठा करीत आहोत. परंतू शासनाने कोरोना रोगाचा प्रसार व प्रार्दुभाव होवू नये म्हणून अंगणवाडीताल बालकांना गरम ताजा आहार ऐवजी त्यांना सुखा व कडधान्य घरपोच देण्याचे ठरविले आहे.परंतू हा निर्णय घेताना शासनाने महिला मंडळ, बचतगट, महिला संस्था यांना कोणत्याही प्रकारे विचार न करता परस्पर हे काम महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशन मुंबई या मोठया संस्थेला दिले आहे. वास्तविकपाहता महिला मंडळ, बचतगट, महिला संस्था हे धान्य घरपोचे पुरविण्यास तयार आहेत. परंतू महिला मंडळ, बचतगट, महिला संस्था हे पुरवठा कडून न घेता या मोठया संस्थेकडून हे काम करून घेण्यात येत आहे.
महिला मंडळ, बचतगट ,  महिला संस्था चे मार्च ,एप्रिल, मे, जुन २०२० या चार महिन्याचे उत्पादन केंद्राचे भाडे, लाईट बिल, सुरक्षा रक्षकाचा पगार इत्यादी खर्च सुरूच आहे. मागील चार महिन्यापासून कोणतेही काम नसल्याने महिला मंडळ,बचतगट, महिला संस्था ची उपासमार होत आहे. सध्या परिस्थती मध्ये शासनाने अनलॉक जाहिर केलेला आहे. त्यामुळे बाजार पेठ व जनजीवन पुर्वपदावर येत आहे. महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशन मुंबई यांच्याकडून धान्य पुरवठा करून घेता ते रितसर व स्थानिक निवड झालेल्या स्थानिक महिला मंडळ, बचतगट, महिला संस्था यांच्याकडून हे धान्य घरपोच पुरवठा करून घ्यावे. माहे जुलै २०२० पासून कच्चे धान्य घरपोच करण्याचे काम  महिला मंडळ, बचतगट,  महिला संस्था बचत गटाच्या मुळ यंत्रणेस पुर्ववत आदेश द्यावेत. अशी मागणी करण्यात आली आहे.

 
Top